उद्योग - व्यवसायात कर्तुत्व गाजवणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा ऐकणे ही प्रेरणादायक गोष्ट असते. हा अनुभव श्वेता गानू यांनी सांगितलेल्या १८ उद्योजकांच्या कथा वाचताना येतो. या पुस्तकातील प्रत्येक उद्योजकाची पार्श्वभूमी वेगळी आहे. मात्र त्यांचा संघर्ष, मेहनत निश्चितच सारखी आहे.
मधुकर देवधर, शंतनू भडकमकर, माधवराव देशमुख, अनुप सुर्वे, आशुतोष पंडित, विजय पालकर, विनय गरगटे, प्रताप मराठे, अरुण नातू आदी उद्योजकांच्या या गाथा आहेत. 'उद्योग व्यवसाय करताना एक मानसिकता लागते.
उत्पन्नाची शाश्वती नसताना स्वतःच्या अंगभूत गुणांवरचा, हिमतीवरचा, क्षमतेवरचा विश्वास तसूभरही ढळू न देता जो शांतपणे कार्यरत राहतो. तोच मोठा उद्योजक होऊ शकतो,' असे डॉ. अभिजित फडणीस यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे. त्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो.